बुरुजवाडी जल प्रकल्प
श्री सत्य साई ट्रस्ट, महाराष्ट्र आणि एचडीएफसी बँकेच्या संपूर्ण मनोभावी सहकार्याने ७ गावांच्या थंड आणि पिण्याचे पाणी गावातील १२०० गावकऱ्यांच्या दारापर्यंत पोहचण्याची जबाबदारी घेतली आहे . प्रकल्प एप्रिल २००६ मध्ये यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला.
दुधानी जल प्रकल्प
माथेरानच्या पायथ्याशी असलेले दुधानी गाव, जेथे श्री सत्य साई सेवा संस्था , महाराष्ट्र १२०० हून अधिक लोकांच्या लोकसंख्येचा फायद्यासाठी जल प्रकल्प हाती घेतला होता.
मागे वर्ष २००२ मध्ये, पाणी दुर्मिळ झाले होते आणि स्त्रियांना पाणी भरण्यासाठी ४ तास लागत होते . या गावाच्या आसपास 40 गावे आहेत आणि यामुळे या परिसरातील कोणत्याही सकारात्मक विकासाचा परिणाम शेजारच्या भागावर सकारात्मक परिणाम होईल.
कोम्बळटेकडी जल प्रकल्प
नोव्हेंबर २००३ ,नवी मुंबईहून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या तारापती, कोम्बळटेकडी,मालदूंग आणि सत्वायेचीवाडी या चार गावांच्या रहिवाशांना खूप आनंद झाला होता कारण त्यांच्या पिण्याच्या पाण्याचे पाईप त्यांच्या दारोदारी पोहचले होते.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे दुःख आणि त्रास कमी करण्यासाठी श्री सत्य साई सेवा संघटनेचे युवक शाखा, ह्यांनी या गावातील नागरिकांना पाईपद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला.या प्रकल्पामुळे तारापट्टी, कोम्बळटेकडी, मालदूंग आणि सत्वायेचीवाडी गावातील 1000 हून अधिक लोकांना फायदा झाला आहे.
कोंडियावाडी जल प्रकल्प
फेब्रुवारी 2011 पर्यंत, कर्जतजवळील कोंडीयाचीवाडी हे असे एक गाव होते जिथे पाण्याचा एकही स्रोत नव्हता. तथापि,श्री सत्य साई सेवा ,महाराष्ट्र आणि गोवा संस्थेकडून गावकऱ्यांना "पाणी" हि अमुल्य आणि विशेष भेट दिली.हा प्रकल्प महिंद्रा कॉपोर्रेट हाऊस आणि महिंद्रा ट्रॅक्टर डिव्हीजन ह्यांच्या संयुक्त प्रयत्नाने केला होता आणि अवघ्या १० महिन्यांच्या उल्लेखनीय कालावधीत हे काम पूर्ण होऊन सुमारे २१५ गावकऱ्यांना लाभ झाला.
पलाशधर जल प्रकल्प
पळसधारे गाव , कर्जत,महाराष्ट्र जवळ असलेले ह्या गावात सुमारे १८०० आदिवासी आहेत आणि त्यांना पाणी आणण्यासाठी जवळ जवळ दोन किलोमीटरचा प्रवास करायला लागायचा. २००७ साली श्री सत्य साई सेवा संस्था, महाराष्ट्र व गोवा ह्यांनी पुढाकार घेऊन टेकडीवर चढून पंप स्थापित केला, टेकडीवर ओव्हरहेड स्टोरेज टाकण्यात आले जेणे करुन त्यांना केवळ पिण्याच्या पाण्याची सोयच नाही तर अजून गावाचा अवलंब ही केला आणि अजूनही मासिक भेटी आणि नारायण सेवा, वैद्यकीय शिबीरे आयोजित करणे आणि मानवी मूल्यांना चालना देत आहे.
मोबाईल जल प्रकल्प
सन २००९ मध्ये ३५३ उप-जिल्ह्यांपैकी २२१ जिल्ह्यांना महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त आणि टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले होते :
- १८०० लिटर क्षमता असलेली पाण्याचे टँकर जवळच्या संभाव्य स्त्रोतांपासून पाण्याची वाहतूक करण्यास गुंतले होते.
- सरकारच्या मदतीने स्रोत ओळखले जात होते.
- मोबाईल वॉटर प्रोजेक्टने गावकऱ्यांच्या तात्काळ पाण्याच्या गरजा पूर्ण केल्या.
- प्रत्येक व्यक्तीला पाणी पुरवठा - १२ लिटर / व्यक्ती / दिवस.